कार्तिक/प्रबोधन/एकादशी
- dileepbw
- Sep 14, 2022
- 2 min read
"वैष्णव" पंथीय लाड सका(शाखीय) वाणी समाज व "शैव" पंथीय लिंगायत वाणी समाज यांना एकमेकांशी जोडणार्या "कार्तिक/प्रबोधन/ एकादशी या धार्मिक सणाचे महात्म्य म्हणजे या दोन्ही संप्रदायाच्या मर्यादा लंघून (ओलांडून) "विष्णू"आणि "शिव" यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत !
कार्तिकी एकादशीचे महत्त्व म्हणजे या दिवशी श्रीविष्णूला बेल वाहिला तरी चालतो तसेच शिवाला देखील तुळस वाहता येते.
हे असे का ?
एकतर ही गोष्ट ‘हरि आणि हर’ म्हणजे ‘श्रीविष्णु आणि शिव’ यांच्यातील अद्वैत दाखवणारी आहे.
दुसरे अध्यात्मशास्त्रीय कारण म्हणजे कालमहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्रीविष्णूची पवित्रके, तसेच तुळशीमध्ये शिवाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते.
त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि श्रीविष्णूला बेल वाहता येतो.
ईश्वरप्राप्तीसाठी धडपडणार्या भक्तांनी ‘शैव-वैष्णव’ भेदाच्या आधारे एकमेकांस विरोध करणे, हे त्यांची संकुचित वृत्ती आणि ईश्वराविषयीचे अज्ञान यांचे द्योतक आहे.
हे अज्ञान दूर व्हावे, तसेच भक्ताने संकुचित वृत्तीचा त्याग करून (स्वसंप्रदायाच्या सीमा लंघून विष्णू आणि शिव यांचे ऐक्य अनुभवावे, हाही या व्रताचा महत्त्वाचा उद्देश आहे.
ईश्वर हा संप्रदायांच्याच नव्हे, तर सर्वच बंधनांपलीकडे असतो असे हे व्रत दर्शविते.
कार्तिकी एकादशी व्रताचे महत्त्व पौराणिक महत्व असे :-
पद्मपुराणामध्ये एकादशी व्रताचे पुढीलप्रमाणे महत्त्व सांगितले आहे.
एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असणार्या विष्णू तत्त्वामुळे वायूमंडल विष्णूतत्त्वयुक्त लहरींनी भारित असते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळस विष्णूतत्त्वाच्या लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करते आणि त्यामुळे तिची आध्यात्मिक स्तरावर कार्य करण्याची क्षमता वाढते.
एकादशीचा उपवासाचे महत्व खालील प्रमाणे :-
पंधरा दिवसांतून एक दिवस संपूर्ण उपवास केल्यास तो शरिराच्या दोषांना जाळून टाकतो आणि १४ दिवसांत आहाराचा जो रस बनतो, त्याचे ओजात रूपांतर होते.
म्हणूनच एकादशीच्या उपवासाचा महिमा आहे.
एरवी गृहस्थाश्रमींनी मासातील केवळ शुक्लपक्षातील एकादशीचा उपवास करावा असे आहारशास्र सांगते.
चातुर्मासात मात्र दोन्ही पक्षांतील एकादशीचे व्रत करावे.
एकादशीचे लाभ खालील प्रमाणे:-
*अर्थ :*
एकादशी ही स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे. गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही. एकादशीला हरिदिन विष्णूचा दिवस, असे संबोधतात.
अशी ही "कार्तिकी एकादशी" पाळणार्या लाड सका(शाखीय) वाणी समाजात सुमारे ५% समाज बांधव "थॅलेसेमिया" या अनुवांशिक रक्त विकाराचे "वाहक (Carriers)" असावेत असे या समाजाच्या स्थलांतराचा इतिहास सांगतो.
अशा समाज बांधवांनी परस्परांशी विवाह करण्याचे टाळल्यास हा समाज सहजपणे "थॅलेसेमियामुक्त" समाज करता येईल.
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील समस्त समाज बांधवांची "थॅलेसेमिया स्क्रिनिंग" ही रक्त तपासणी करायची झाल्यास काय करावे लागेल ?
किमान विवाहाचा निर्णय घेण्यापूर्वी तरी ही तपासणी अवश्य करावी व दोन थॅलेसेमिया वाहकांनी परस्परांशी विवाह करणे नक्कीच टाळावे.
सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची अशी ही वैज्ञानिक माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे अत्यंत महत्वाचे सामाजिक कार्य करणार्या सौ.रेखाताई मालपुरे, कल्याण यांनी भजन कीर्तनाच्या माध्यामातून सर्व भक्तांना "थॅलेसेमिया स्क्रिनिंग" ही रक्त तपासणी करण्यास प्रवृत्त करण्याचा संकल्प केला आहे.त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन !
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ७०५२)
Comentários