"चर्चगेट ऊर्फ चिंतामणराव देशमुख स्थानक"
- dileepbw
- Feb 25, 2023
- 2 min read
"चर्चगेट ऊर्फ चिंतामणराव देशमुख स्थानक"
चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी केंद्रीय अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
या निमित्ताने माझी चर्चगेट रेल्वे स्टेशनला दिलेली पहिली भेट आठवली.मी तेव्हा PD ला होतो व आमच्या पनवेलच्या NCC चे बटालियन ऑफिस होते चर्चगेटला ! माझी Under Officer व माझा वर्गमित्र विजय भगत याची Company Hawaldar Major म्हणून निवड झालो होती.ते गणवेश आणण्यासाठी आम्हाला मुंबईला जावे लागणार होते.
विजय भगत हा एक वर्ष मुंबईला शिकायला असल्याने त्याला मुंबईची इत्यंभूत माहिती होती. त्यामुळे आम्ही पनवेलहून सकाळी ८ ची पनवेल-दिवा लोकल पकडली व दिव्याला उतरून आधी दादर व नंतर चर्चगेटची लोकल पकडून
बटालियन ऑफिसला पोहोचलो.मी भांबावून जाऊन "जीवाची मुंबई" करीत होतो.माणसांची व वाहनांची एवढी प्रचंड गर्दी मी आयुष्यात पहिल्यांदाच पहात होतो.इमारतींकडे मान वाकडी करून पहावे लागते हे पहिल्यांदाच अनुभवत होतो. अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या. घशाला सारखी कोरड पडत होती.शेवटी शेजारच्या आझाद मैदानावर जाऊन डबा खाल्ला व ऊंटासारखा भरपेट पाणी प्यालो.तेव्हा कुठे अंगात हुषारी आली.जरासे लांबवरूनच या चर्चगेट रेल्वे स्टेशनचे सौंदर्य नीट न्याहाळता येते.
"चिंतामणराव देशमुख रेल्वे स्थानक(चर्चगेट)" हे मुंबईच्या पश्चिम उपनगरी रेल्वेवरील एक टर्मिनस आहे.मुंबईच्या तटबंदीच्या शहरातील तीन वेशींपैकी एक वेस या ठिकाणी होती.हा दरवाजा थेट "सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च" कडे वळला,म्हणून त्यास "चर्च गेट"असे नाव देण्यात आले.
स्टेशनचे बांधकाम १७७० पर्यंत पूर्ण झाले आणि त्यास "चर्चगेट स्टेशन" असे नाव देण्यात आले. मुंबईच्या पश्चिम रेल्वे उपनगरी नेटवर्कचे हे पहिले स्थानक आहे. चर्चगेट स्टेशन हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गाचे टर्मिनस आहे. हे शहराचे दक्षिणेकडील स्टेशन आहे, जरी १९३१ पर्यंत कुलाबा हे सर्वात दक्षिणेकडील स्टेशन होते, तथापि चर्चगेटच्या पलीकडील रेल्वे लाईन काढली गेली आणि चर्चगेट हे सर्वात दक्षिणेकडील स्टेशन बनले.
१९५५ मध्ये अंकलेश्वर ते उत्तरान दरम्यान रेल्वे मार्ग बांधून मुंबई, बडोदा आणि मध्य भारत रेल्वेचे उदघाटन करण्यात आले. १९५९ मध्ये ही ओळ पश्चिम किनारपट्टीवर मुंबईपर्यंत वाढविण्यात आली. मरीन लाईन्स जवळ ग्रॅंट रोड स्थानकाच्या पुढे, पूर्वेकडील किनाऱ्यावरील एक ट्रॅक तयार झाला. १२ एप्रिल १९६७ रोजी विरार ते बॉम्बे बॅक बे पर्यंत प्रत्येक मार्गाने प्रथम उपनगरी रेल्वे सुरू केली.त्यानंतर विरार,बससेन,पांजे,बोरेवली, पहाडी,अंदारू,सांताक्रूझ,माहीम,दादर,ग्रॅंट रोड आणि बॉम्बे बॅकबे अशी नावे देण्यात आली. ब्रिटिशांच्या गुलामीचे आणखी एक उदाहरण लोप पावणार याचा मनस्वी आनंद आहे.
Comments