नाग पंचमी
- dileepbw
- Aug 13, 2021
- 1 min read
"नाग पंचमीचे ऐतिहासिक महत्व"
माझ्या "सका/शक/Scythian" लोकांच्या अभ्यासात "नाग पंचमी" या सणाचे जे ऐतिहासिक महत्व मला गवसले ते सादर करीत आहे.
मध्य आशियातील "सायबेरिया" प्रांतामधील "टूंड्रा" या गवताळ प्रदेशातून आपले "सका" वंशाचे पूर्वज मुख्यत: कास्पियन समुद्र, तुर्कमेनिस्तान व गोभी वाळवंट अशा तीन दिशांना विभागले गेले.त्या पैकी "माओस/मोगा" नावाच्या राजाच्या नेतृत्वाखाली इसवी सन पूर्व दुसर्या शतकात तत्कालिन भारतातील "गांधार" या प्रांतात त्यांनी स्थलांतर केले.त्यावेळी तेथे नागपूजक "ग्रीक" लोकांची सत्ता होती."आयोनिया" प्रांतातून भारतात स्थलांतरित झालेले हे "आयोनियन ग्रीक" लोक भारतात "यवन (Ionian)" या नावाने ओळखले जात असत.या इंडो-ग्रीक लोकांना "बॅक्ट्रियन ग्रीक" या नावाने देखील ओळखले जात असे.
इसवी सनाच्या दहाव्या शतकापर्यंत "नागपूजक" असलेल्या सुमारे तीस ग्रीक राजांनी भारतावर राज्य केले. त्यानंतर "सका" वंशाचा पार्थियन(पहलव/पल्लव/पार्थव) राजा "गोंडोफारेस" याचे राज्य आले.त्यानंतर सुमारे सहाशे वर्षे "सका" लोकांनी भारताच्या मोठ्या भूभागावर सत्ता गाजविली."तिसरा रूद्रसिंह" हा भारतातील शेवटचा "सका" वंशाचा राजा इसवी सन ३९५ साली होऊन गेला.
लाड सका(शाखीय) वाणी समाजात साजरा केला जाणारा "नागपंचमी" चा सण या नागपूजक "ग्रीक" राजांशी संबंधित सण आहे.या "ग्रीक" राजांची स्वतंत्र अशी "गणतांत्रिक(Republic)" स्वरुपाची राज्ये(सत्रापी) होती व ती "सत्रापी" या नावाने ओळखली जात असत.(उदा.जम्मू-काश्मीर मधील "अनंत" या ग्रीक नागराजाचे अनंतनाग हे सत्राप,तर दुसरा ग्रीक नागराजा "वासुकी" याचे कैलास मानसरोवर हे सत्राप,तिसरा नागराजा "तक्षक" याचे सध्याच्या पाकिस्तानातील तक्षशीला हे सत्राप,चवथा नागराजा "करकोटक" तर पाचवा "ऐरावत" याचे रावी हे सत्राप).या पाच नागराजांची गणराज्ये ऐकमेकांच्या राज्याला लागून होती.त्यांच्या प्रजेने या पांच पराक्रमी राजांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी दरवर्षी जो उत्सव आयोजित करीत असत तोच उत्सव आज "नागपंचमी" म्हणून साजरा केला जातो.
या नागपूजक "ग्रीक" राजांची सत्ता जेथे जेथे पसरली तेथे तेथे "नागपूजन" सुरू झाले.
Comments