नामपूरचा राजकीय वाडा
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामधील "सामाजिक उत्क्रांती व परिवर्तन"
बागलाणात दुष्काळाच्या काळात जी आंदोलने झाली त्याचे केंद्र लाडसक्का/लाडसका/लाडशिक्के/लाडशाखीय वाणी समाजाचे "समाजरत्न" श्री. नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांचा नामपूर मधील वाडा हे होते.
नामपूरला श्री. नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" प्रतिवर्षी "भागवत" पुराणाची पोथी सुरु करीत. त्या निमित्ताने जमलेल्या लोकांना वाड्यातील गुप्त बैठकांत नेत्यांनी (सर्वश्री सितारामशास्त्री, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, नाशिकचे वकील दादासाहेब गद्रे, जानोरकर, डॉ. खाडिलकर, गो.ह.देशपांडे, अप्पासाहेब गुळवे इ.) घेतलेले निर्णय सांगितले जात व त्याच्यावर लोकांनी करायची कार्यवाही यावर चर्चा होत असत.
(संदर्भ:-“बागलाणचे बाबा",पृष्ठ क्र.११९-१२०,१५९,१६५ लेखक -प्रा.डॉ.प्रभाकर मांडे, प्रकाशक-गोदावरी प्रकाशन).
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments