पिलखोडचे देव
- dileepbw
- Sep 25, 2022
- 1 min read
"पिलखोड" च्या "देव" समाजबांधवांच्या उपजीविकेवर "ब्रिटीश सुधारणां(रेल्वे व टेलेग्राफ)" चा भलाबुरा परिणाम झाला.
दळण-वळणाच्या सुविधांमुळे (रेल्वे,टेलेग्राफ,जंगलामधून सुरक्षित प्रवास,मोटारीने वेगवान प्रवास इ).रोजचा माल रोज खरेदी करता येऊ लागला. त्यामुळे कमी भांडवलात व्यापार सुरु करता येऊ लागला.त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांची संख्याही वाढली.
दळण-वळणाच्या सोयीमुळे खेडोपाडी व गल्लोगल्ली किराणा दुकाने सुरु झाली.
त्यामुळे आठवडे बाजाराचे महत्व व गरज संपुष्टात आले.
अडत्यांची संख्या घटली. तसेच काही जिनसांचा व्यापार दुसऱ्यांच्या ताब्यात गेला. कच्छी(मेमन),बोहोरा,मुसलमान,भाटिया असे बाहेरील अनेक छोटे मोठे व्यापारी स्पर्धेमध्ये उतरू लागले. त्यामुळे व्यापाराची "गती व व्याप्ती" वाढली तरी नफ्याचे प्रमाण घटू लागले.
नफेखोरीचे मूळ कारण पेरणीच्या काळात असणारा धान्याचा/बी-बियाण्याचा तुटवडा ! दळण-वळणाच्या सुविधांमुळे तो संपला.
इ.स. १८७६-७७ या काळात दुष्काळ पडूनही बाहेरून धान्य आयात झाल्यामुळे धान्याचे भाव वाढले नाहीत.त्यामुळे "मनोती" सारखा "धान्यावर धान्याचे व्याज" हा "पिलखोड" च्या "देव" समाजबांधवांचा व्यवसाय ही अडचणीत आला.
"सुरत,खंबायत व भडोच" ही गुजरातमधील आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्रे खरे तर "देव" समाजबांधवांची महाराष्ट्रामध्ये येण्या पूर्वीची मूळ गावे होती.
ब्रिटीश सुधारणांमुळे प्राप्त झालेल्या या परिस्थितीमध्ये "देव" समाजबांधवांनी "किरकोळ स्थानिक व्यापारा" मधून व "किरकोळ सावकारी" मधून बाहेर पडून मारवाडी,जैन,बोहरा,पारशी,भाटीया,पंजाबी,कच्छी मेमन अशा अन्य व्यापारी समाजांसारखा "आंतरराष्ट्रीय" स्तरावर व्यापार सुरु केला असता तर आज चित्र वेगळे दिसले असते.
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Commentaires