top of page

मिठाचा सत्याग्रह

  • dileepbw
  • Sep 11, 2022
  • 1 min read

महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामधील "सामाजिक उत्क्रांती व परिवर्तन"

इ.स.१९३० च्या सुमारास "महात्मा गांधीं" नी "मिठाचा सत्याग्रह" सुरु केला. त्यासाठी महाराष्ट्रातील "लाडसक्का/लाडसका/लाडशिक्के/लाडशाखीय वाणी" समाजाचे "समाजरत्न" श्री. नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांच्या उत्तेजनाने नामपूरचे श्री. नारायण गणपत खुटाडे व सोमपुरचे श्री. बापू सावळाराम वाणी हे दोन "लाडसक्का/लाडसका/लाडशिक्के/लाडशाखीय वाणी समाजाचे समाजबांधव" महात्मा गांधींनी आयोजित केलेल्या "मिठाच्या सत्याग्रहा" त सहभागी होण्यासाठी विलेपार्ले,मुंबई येथे रवाना झाले.

त्यांना "रत्नागिरी" जिल्ह्यातील "शिरोडा" येथे इंग्रज सरकारने अटक केली व २१ दिवस तुरुंगात ठेवले. त्यांनी मिठाच्या सत्याग्रहातून आणलेल्या मिठाच्या पुड्यांचा नामपूर येथे जाहीर लिलाव करण्यात आला व जमा झालेली ६६५० रुपयाची रक्कम बागलाण येथे नियोजित केलेल्या जंगल सत्याग्रहासाठी श्री. नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांच्याकडे जमा करण्यात आली.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page