गंधमुक्त
- dileepbw
- Sep 13, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या चाली-रिती - गंधमुक्त
महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या चाली-रितींप्रमाणे पाळल्या जाणाऱ्या "सोळा संस्कारां" पैकी एक महत्वाचा संस्कार म्हणजे "अंत्यविधी" संस्कार !
या "अंत्यविधी" संस्कारामधील "गंधमुक्त" संस्कार म्हणजे मृतात्म्याच्या स्मृतीनिमित्त आयोजित केलेले "लाड सका(लाड शाखीय) वाणी" जमातीचे "सामुहिक भोजन" !
या पंगतीला "लाड सका(लाड शाखीय) वाणी" जमातीतील "मृतात्मा" "काक" म्हणजे "कावळा" या रूपाने सहभागी होतो (काकस्पर्श - कृपया चित्र पहा) व त्या नंतरच त्याला मोक्ष मिळतो अशी श्रद्धा आहे.
अशीच श्रद्धा विविध भारतीय समाजात विविध पद्धतीने पाळली जाते.
"कोळी" व 'विष्णोई" समाज मृताच्या दहन स्थानावर आपापल्या जमातीचे "सामुहिक भोजन" आयोजित करतात. तर "बैगा" समाज मृताच्या दहन स्थानावर एक काळी व एक पांढरी कोंबडी मारून आपल्या जमातीचे "सामुहिक भोजन" आयोजित करतात.
"गोंड" समाज मृताच्या दहन स्थानावर भोजन व मद्यपान आयोजित करतो. "लोहार" व "तेलगू कोष्टी" समाजात सुद्धा मृताच्या दहन स्थानावर जमातीचे "सामुहिक भोजन" आयोजित करण्याची प्रथा आहे.
"पंका" समाज मृताच्या दहनस्थानावर नारळ फोडून त्याचा प्रसाद आपल्या जमातीमध्ये वाटतो. त्यावेळी प्रसादाचा काही भाग प्रत्येक समाज बांधव मृताच्या दहन स्थानावर वाहतो.
"तांबट" समाजात अशा पंगतीच्या वेळी मृतात्म्यासाठी केळीच्या पानावर जेवण वाढून ते घरासमोर ठेवण्याची प्रथा आहे. मृतात्म्याला आपले भोजन सापडावे म्हणून तेथे एक दिवा लावून ठेवण्याचीही प्रथा आहे.
"कोल्हाटी" समाजामध्ये तर फारच वैशिष्ट्यपूर्ण प्रथा आढळते. या समाजात मृत्युच्या तिसऱ्या दिवशी मृताच्या दहनस्थानावरून मृताची कवटी घरी आणण्याची प्रथा आहे. या कवटीची तीन दिवस विधिवत पूजा करून मग पुन्हा तिचे दफन केले जाते.
"लिंगायत" वाणी समाजामध्ये तर संपूर्ण मृत शरीरासमवेत "लिंगायत वाणी" जमातीचे "सामुहिक भोजन" आयोजित करण्याची प्रथा होती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments