top of page

"भारतीय रागदारी - भाग - १०"

  • dileepbw
  • Sep 4, 2023
  • 2 min read

"भारतीय रागदारी - भाग - १०"

©दिलीप वाणी,पुणे

"भारतीय रागदारी" हा एक "अगम्य विषय" असावा अशी भीती बालपणापासून माझ्या मनात वसलेली आहे.आज टोपी व उदय यांच्या प्रामाणिक कबुलीमुळे त्याचा अभ्यास करण्याचे धाडस करणार आहे.प्रथम रागाच्या "व्याख्यां" ने सुरूवात करतो.काही चुकले-माकले तर जयंता,दीप्या, राजा,निक्या यांनी मोठ्या मनाने माफ करावे.या लेखमालेवर उदयने आधीच "आ बैल मार" म्हणून नेहेमीप्रमाणेच "खवचटपणा" दाखवला आहे.पण कधी नव्हे ती अंजली मंगरूळकर या विषयावर बोलती झाली आहे.तेव्हा ऐका तर खरं ! ती काय सांगते आहे ते !

अंजली मंगरूळकरने दिलेल्या "रागां" च्या अनेक उदाहरणांमधील आपण गुलजार यांनी एका विशिष्ट "रागा" मधे बांधलेले "बंटी आणि बबली" या चित्रपटातले बच्चन कुटूंबीयांवर चित्रीत झालेले आलिशा चिनाॅय,शंकर महादेवन व जावेद अली यांनी गायलेले "कजरा रे कजरा रे" हे गाणे घेऊ या. कशाची आठवण होते हे गाणे ऐकून ? शंकर एहसान लाॅय या संगीतकारांनी ते "दिगंबरा हो दिगंबरा" या दत्ताच्या लोकप्रिय आरतीच्या चालीवर बांधलेले हे गाणे आहे.दोन्ही गाण्यांचा राग एकच !

कोणता ? भारतीय रागदारीमधे काय वैशिष्ट्य असते संगीतकारांचे ? वाचा.

गाण्याविषयी विचार करण्याची प्रक्रिया असते ती निरंतर विचारांतून आलेली असते.कोणताही पूर्वसंदर्भ न घेता गाणं साकार करणं हा सगळा अनुभव अत्यंत "रोमांचकारी" असतो."शब्दांचं सामर्थ्य" आणि "स्वरांची भावोत्कटता" यांचा संगम झाला, की त्यातून सुरेल गीत जन्माला येतं. कवी आणि संगीतकार अशा उत्तम गीतासाठी झटत असतात. या सगळ्या प्रक्रियेत गायक हा त्या गीताचा प्रथम श्रोता असतो. त्यानंतर तो या प्रक्रियेत सहभागी होऊ लागतो आणि शेवटी या प्रक्रियेचा अविभाज्य घटक बनतो. या स्थित्यंतरात गायकाची अंगभूत प्रतिभा खुलण्यासाठी संगीतकाराचा रचनेकडे पाहण्याच्या दृष्टिकोन खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.

संगीतकार आपलं सगळं व्यक्तिमत्त्व त्याच्या स्वररचनेतून उभं करत असतो. एखादी कविता वाचल्यावर त्या संगीतकाराच्या मनात नेमक्या कोणत्या भावना उमटल्या असतील त्याची कल्पना आपल्याला त्यानं दिलेली चाल गाताना आणि श्रोता म्हणून ऐकताना येत असते. अर्थात संगीतकाराच्या पुढ्यात आलेल्या शब्दांमधून त्याच्या मनात तयार झालेलं चित्र तो गायकामार्फत श्रोत्यापुढे मांडतो.त्यावेळी संगीतकाराचा गाण्याविषयी झालेला विचार तंतोतंत उमटवण्याचं काम गायक करत असतो.

संगीतकार जेव्हा त्याने लावलेली चाल गाऊन दाखवतो त्यावेळी त्याच्या मनातले भाव,कवीने व्यक्त केलेले भाव आणि संगीतकाराने दिलेले स्वर, त्या स्वरांचे म्हणून असलेले भाव हे सगळं समजून गायकाला गायचं असतं.या सगळ्या प्रक्रियेत "गायक" स्वतःही व्यक्त होतच असतो. संगीतकाराचं,कवीचं जे म्हणणं आहे ते गायकाला आपलंसं करून गायला लागतं.असं "आपलंसं" करून गात असताना मग गायकाला त्यातला भावनिक धागा सापडायला लागतो.भावना व्यक्त करण्याची आपली स्वतःची एक स्वरभाषा गायकाला त्यातून मिळते.

Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page