"भारतीय रागदारी - भाग - २३"
- dileepbw
- Sep 5, 2023
- 1 min read
"भारतीय रागदारी - भाग - २३"
©दिलीप वाणी,पुणे
माझ्या "भारतीय रागदारी" या लेखमालेला प्रतिसाद देणार्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! तीर्थरूपांच्या सततच्या बदल्यांमुळे माझी "संगीत साधना" थांबली.त्यामुळे संगीताचे विशेष ज्ञान प्राप्त करू शकलो नाही.त्यामुळे "जो राग कानाला चांगला वाटतो तो आवडता" असे मी समजतो.तो का आवडतो याचा वैद्यकीय अभ्यास आता सु केला आहे.त्याला Dopamine,Serotonin, Oxytocin असे नानाविध Neurotransmitter जबाबदार असतात असे आत्ताशी लक्षात येऊ लागले आहे.वेळ आली की सांगेन.सध्या
केवळ "कानसेन" होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातून काय गवसले ? ऐका.
प्रत्येक रागाची स्वतःची अशी एक "ओळख" असते.त्यांचं एक "चलन" असते.त्यामुळे प्रत्येकाला एकच राग आवडेल असं नाही.प्रत्येकाला आपापल्या आवडीनुसार "राग" आवडतो.त्याने मेंदूमधे कोणता Neurotransmitter निर्माण केला आहे.त्यावर ते अवलंबून असते.सामान्यतः "काफी थाटा" तील राग रसिकांना जास्त आवडतात,कारण गंधार व निषाद कोमल असल्यामुळे राग गाताना वातावरण "मधुर" बनते.कारण Dopamine व Serotonin जास्त प्रमाणात तयार होतात.ही काही उदाहरणे पहा.
१.'ऩि रे ग म॑ प,प म॑ रे ग,ग रे ऩि रे सा ' असे
नोटेशन असलेला यमन व भैरवी हा राग एकदा ऐका."सखी एरी आली पिया बिन
कलन परत मोहे घडी पलछिन छिन" ही बंदिश ऐकून अंगावर शहारे येऊन गदगदून येते की नाही ?
कोणत्या "Neurotransmitter" चा उद्रेक होत असावा ?
२.वादी स्वर - ग, संवादी - नी अशी तीव्र 'म' व बाकी सर्व स्वर शुद्ध घेऊन तयार होणारी "ऩि रे ग म॑॑ प ध नी सां" ही आरोह मंद्र सप्तकातील 'नी' पासून सुरू होणारी "यमन कल्याण" ची सुरावट ऐकून Dopamine secretion सुरू होते की नाही ? मध्यरात्री हा राग गायला इतका प्रभावशाली असतो की मन शांत झालेच पाहिजे.
का ? Happy hormones तयार होतात म्हणून ? असा विचार तर करून पहा.




Comments