top of page

महंत विचारदास

  • dileepbw
  • Sep 7, 2022
  • 1 min read

महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर कुलदेवता,मानवी मन व "संत महात्मे" यांचा परस्पर संबंध दाखविणाऱ्या काही इंग्रजी भाषेतील "पोस्ट" आपण खालील अभ्यासगटात अवश्य वाचाव्या.

त्यानंतर असे काही "संत महात्मे" लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजात होऊन गेले काय असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडेल.

खरे तर "नदीचे मूळ" व "संत महात्मे यांचे कूळ" शोधू नये असे म्हणतात.

कोणत्याही "संत महात्मे" लोकांना "जातीच्या चौकटी" त बंधू नये हे देखील खरे !

कारण "संत महात्मे" केवळ एका जातीच्या न्हवे तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी जन्माला आलेले असतात.

पण केवळ सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजात जन्माला आलेले,मालेगाव तालुक्यातील "चिंचवे" गावचे संत "श्री.विचारदास महाराज" यांचे कार्य आपल्यापुढे ठेवीत आहे :-

इ.स.१९४२ साली “वैष्णव” पंथाच्या लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे “शैव” भक्त श्री.वामन दामू बागडे(वाणी बुवा) उर्फ महाराज “विचारदास” यांनी जळगाव जिल्ह्यातील, चाळीसगाव तालुक्यातील "गाळणे" या गावी मठ स्थापन केला.

या मठाच्या माध्यमातून “वैष्णव” व “शैव” या हिंदू धर्मातील दोन पंथांचा समन्वय साधण्याचे महत्वपूर्ण कार्य लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे संत “विचारदास”महाराजांनी आयुष्यभर केले.

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page